जालना जिल्ह्यात 25% पीक विमा मंजूर, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी लाभ मिळणार 25% pik vima update

25% pik vima update जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी 25% पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पीक विम्याचे वितरण करण्यात येईल.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या शेवटी जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, ज्यामुळे तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रँडम सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात 50% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्याचे आढळले.

तीन लाख शेतकऱ्यांना 412 कोटी रुपयांचा पीक विमा

जालना जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना 412 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. पंचवीस टक्के रक्कम आगाऊ म्हणून मंजूर करण्यात आली आहे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे.

हे पण वाचा:
ration card big update शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची सूचना: केवायसी प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ration card big update

इतर जिल्ह्यांमध्ये देखील अधिसूचना जारी

जालना जिल्ह्याच्या आधी नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत देखील पीक विमा संदर्भातील अधिसूचना काढण्यात आली होती. जालना जिल्ह्याच्या अधिसूचनेनंतर इतर जिल्ह्यांमध्येही अशा अधिसूचना निघण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना अधिकृत अधिसूचनेनुसार मंडळनिहाय माहिती आणि नुकसानाचे प्रमाण लवकरच उपलब्ध होईल.

हे पण वाचा:
कापूस बाजार भाव देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 18 ऑक्टोबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा