पीक विम्याच्या रखडलेल्या रकमेविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे आंदोलन: जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम

वारंवार तारखांच्या खेळामुळे शेतकऱ्यांचा संताप

पीक विम्याच्या रखडलेल्या रकमेच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतरही नऊ महिने उलटले तरी शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. तुपकरांनी सांगितले की, नियमांनुसार, तक्रार दाखल केल्यानंतर 25 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळणे गरजेचे होते. परंतु, कंपनीकडून पैसे मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागला आहे.

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम आंदोलन

तारखा देऊन शेतकऱ्यांना फसवले जात असल्याने तुपकरांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम ठोकला आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत ते इथून हलणार नाहीत. तुपकर म्हणाले, “15 सप्टेंबरपर्यंत पैसे मिळतील असा आश्वासक दिला होता, परंतु ते आश्वासनही पाळले नाही. त्यामुळे मी आता येथे मुक्काम करतोय. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर मी इथून हलणार नाही.”

कृषी विभाग आणि विमा कंपनीवर गंभीर आरोप

तुपकर यांनी कृषी विभाग आणि विमा कंपन्यांवर संगनमताचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारला आहे. पंचनाम्यातही शेतकऱ्यांच्या सह्या नाहीत, आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य रक्कम दिली जात नाही. त्यामुळे कंपनीवर कारवाई होईपर्यंत आणि शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत मी इथून हटणार नाही.”

हे पण वाचा:
Ladki Bahini Yojana Maharashtra लाडकी बहीण योजनेतून दिवाळी बोनस मिळणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती Ladki Bahini Yojana Maharashtra

रविकांत तुपकरांच्या या अनोख्या आंदोलनाने शेतकरी वर्गाचे लक्ष वेधून घेतले आहे, आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन कितपत यशस्वी ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा:
कापूस बाजार भाव देशातील आजचे कापूस बाजार भाव Cotton rate 18 ऑक्टोबर 2024

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा