खरीप हंगाम २०२४: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा Crop Insurance 2024

Crop Insurance 2024 राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

खरीप हंगाम २०२४ मध्ये जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये राज्यातील बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्य शासनाने काही जिल्ह्यांचे प्रस्ताव मंजूर केले असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

पीक विमा योजनेअंतर्गत अग्रिम भरपाई

पीक विमा योजनेच्या निकषानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय पीकविमा समितीद्वारे सर्वेक्षण करून पंचवीस टक्के अग्रिम पीकविमा देण्याची तरतूद आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यास ‘वाइड स्प्रेड’ अंतर्गत पीकविमा देखील दिला जातो.

अधिसूचित जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण कार्य सुरू

हिंगोली, नांदेड, परभणी, आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आल्या असून, या भागांमध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांसाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ११० महसूल मंडळांमध्ये सोयाबीनसाठी, नांदेडमध्ये तूर, मूग, उडीद, आणि सोयाबीनसाठी, तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही अधिसूचना निर्गमित झाल्या आहेत.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना पुरवणी मागणी १४०० कोटींची विशेष तरतू

दिवाळीपूर्वी पीकविम्याचे वितरण

अधिसूचना जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीकविमा लवकरच वितरित केला जाईल. इतर जिल्ह्यांमध्येही जिथे नुकसान होईल, तिथे दिवाळीपर्यंत पीक विम्याचे वितरण होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक क्लेम्सची सर्वेक्षण प्रक्रिया सध्या सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचा आधार मिळू शकतो.

हे पण वाचा:
लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी

Leave a Comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा